ऑपरेशन सिंदूर यशस्वी : भारतीय सैनिकांनी नऊ दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त ; ९० हून अधिक दहशतवादी ठार

ऑपरेशन सिंदूर यशस्वी : भारतीय सैनिकांनी नऊ दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त ; ९० हून अधिक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. भारतीय सेनेनं पाकिस्तानात घुसून जशाच तसे उत्तर दिले आहे. यात काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशश्वी केली आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैनिकांनी पहाटे १.३० वाजता राफेल आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांचे प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि ९० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.

भारताने कुठे केले हल्ले?

बहावलपुर : हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झालय.

मुरीदके : हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे लश्कर-ए-तैयबाचा तळ होता. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता.

गुलपुर : हा दहशतवादी तळ LoC (पुंछ-राजौरी) पासून 35 किलोमीटर दूर आहे.

लश्कर कॅम्प सवाई : POK च्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत आहे.

बिलाल कॅम्प : हा जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चपॅड आहे. हा तळ दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता.

कोटली : LOC पासून 15 किमी अंतरावर लष्करचा तळ होता. 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती.

बरनाला कॅम्प : हा दहशतवादी तळ LOC पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.

सरजाल कॅम्प : सांबा-कठुआसमोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून 8 किमी अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता.

मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ)– हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर होता.