दहावी, बारावीचा निकाल मे महिन्यात लागणार ; उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण
नागपूर : यंदा शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले.
२०२५ साली परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागेल असे, शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपत आले असून, निकालाचे काम लवकर सुरू करण्यात येईल अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. जून महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने यंदा मे महिन्यातच निकाल लावणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. निकालाची अधिकृत तारीख अजून बोर्डाने जाहीर केलेली नाही पण बारावीचा निकाल हा मे महिन्यातच लागणार असे सांगण्यात आले आहे.
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा १५ मे च्या दरम्यान बारावीचा निकाल लागणार आहे, असे सांगण्यात आले आहे. यंदा पहिल्यांदाच निकाल मे महिन्यात लागणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशसाठी प्रक्रिया सुकर होणार आहेत. तर दुसरीकडे दहावीचा निकालही मे महिन्यात लागणार असल्याची माहिती येत आहे. १७ किंवा १८ मे ला दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.



